यवतमाळ जिल्ह्यात पीकविमा नाकारल्यामुळे  मारेगाव तालुक्यात ७२ तासात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -शेतकऱ्यांना उभारी देणाऱ्या सरकारला तुतारी लावण्याची वेळ आली -किशोर तिवारी 

दिनांक २ फेबुवारी २०२०६

यावर्षी सतत पाऊसाने प्रमुख नगदी कापुस सोयाबीन बुडल्यामुळे व सततची नापीकी बँकांनी पिकर्ज न दिल्यामुळे कर्जबाजारी कोरडवाहू  मारेगाव तालुक्यात मागील ७२ तासात ३ दुर्दैवी आत्महत्या केल्या असल्याची माहिती शेतकरी  आत्महत्या व कृषी संकट या गंभीर विषयावर मागील ३० वर्षापासून सतत कार्य  करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी दिली आहे .जिल्हा प्रशासनानुसार  या तीन शेतकऱ्यांची नावे पार्डी  येथील कैलास गाडगे सुर्ला येथील विलासभाऊ मेश्राम तर गोरज येथील युवा शेतकरी अविनाश पानघाटे असुन हे आदीवासी दलित मागासवर्गाचे असुन यवतमाळ जिल्ह्यात २०२६ मध्ये आजपर्यंत सरकारी आकडेवारी नुसार ६४ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारी मुळे आत्महत्या केल्या आहेत यवतमाळ जिल्ह्यात २०२६ मधे ६४ शेतकऱ्यांच्या  व्यतिरिक्त भाड्याने  यांच्या नावाने सातबारा नाही म्हणुन सरकार दरबारी या आत्महत्यांची नोंद शेतकरी आत्महत्या म्हणून  नाही ते भुमिहीन २४ शेतकऱ्यांनी सुद्धा आत्महत्या केल्या आहेत मात्र यांच्या दारावर एकही प्रशासनिक अधिकारी वा खासदार आमदार गेला नसुन जिल्ह्याधिकारी यांनी शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रकल्प 'उभारी' सुरु केला असुन मात्र जिल्ह्यात सर्व सत्ताधारी राजकीय नेते अधिकारी हे आपली आर्थिक परिस्थिती उभारण्यात व्यस्त आहेत असा आरोप किशोर तिवारी यांनी यावेळी केला आहे  .

प्रचंड नापिकी नंतरही पीकविमा नाकारल्याने शेतकरी आत्महत्या वाढणार सरकारला तुतारी लावण्याची वेळ आली -किशोर तिवारी 

यावर्षी ३ जून पासुन १२ नोव्हेंबर पर्यंत सतत पावसाने कहर केला सरकारने दोन वेळा नुकसान भरपाई दिली मात्र त्यामुळे कृषी संकट कमी झाले नाही याला फक्त ५० टक्के बँका मार्फत पीककर्ज वाटप ,सावकारांच्या व  मायक्रो फायनान्स बचत गटा मार्फत लूट ,लागवडीचा खर्च  दुप्पट झाल्यामुळे कर्जाचे अनियंत्रित  ओझे त्यातच संपुर्ण सोयाबीन नापीकी ,कापसाचे ४० टक्के आलेले पीक ,तुरीच्या पिकाची नापिकी सरकारची मदत तटपुंजी नंतर पीकविमा मदत हाच आशेचा किरण होता मात्र जिल्ह्यातील नाकर्त्या नेत्यामुळे फक्त यवतमाळ जिल्ह्या वंचित ठेवण्यात आल्यामुळे  कृषी संकटात भरच पडली आहे व या निर्णयामुळे प्रचंड प्रमाणात आत्महत्या वाढतील तरी महाराष्ट्र सरकारने यवतमाळ जिल्ह्यात पीकविमा मंजूर करावा अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .

पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात  जुन्या बेरार वा वऱ्हाड चे यवतमाळ ,अमरावती ,अकोला ,वाशीम ,बुलढाणा येतात व प्रशासकीय रित्या पूर्व विदर्भाचा वर्धा जिल्हा येतो.बहितेक सर्व क्षेत्रात कोरडवाहू शेती करण्यात  येते.पश्चिम विदर्भात ४५ टक्के क्षेत्रात  कापुस घेण्यात येतो तर ४० टक्के क्षेत्रात सोयाबीन व उरलेल्या क्षेत्रात विविध डाळ ,ज्वारी   घेण्यात येते मागील वर्षी २०२५ मध्ये यवतमाळ जिल्ह्यात विक्रमी ४४६ आत्महत्या झाल्या असुन त्या पाठोपाठ अमरावती ३९६ ,अकोला ३८८,बुलढाणा ३४३, वर्धा २२४ तर वाशीम जिल्ह्यात  २१२  शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असुन यामध्ये युवा शेतकरी ,भाड्याने शेती करणारे शेतकरी यांच्या नावाने सातबारा नाही म्हणुन सरकार दरबारी या आत्महत्यांची नोंद नाही . मक्त्याने म्हणजे भाड्याने शेती करणारे शेतमजुरांची संख्या प्रत्येक खेड्यात ५० टक्के असुन यांना सरकारी पीककर्ज तसेच सरकारची नुकसान भरपाई मिळत नाही वरून शेतीचे भाडे नापिकी झाली तरी देणे अटळ आहे यामुळे सातबारा नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावर्षी प्रचंड वाढल्या आहेत कारण ते खाजगी सावकार ,मायक्रो फायनान्स कंपन्या .गावागावात सुरु झालेल्या राजकीय नेत्यांच्या नागरी पत संस्था आघाडी वर असुन ह्या गंभीर विषयावर बोलण्यास सरकार,प्रशासकीय यंत्रणा तसेच सर्वच राजकीय पक्ष बोलण्यास तयार नाहीत २०२५ मध्ये झालेल्या विक्रमी शेतकरी आत्महत्या असुन जर सरकारने पत पुरवडा ,बियाणे सुधार ,पीक पद्धतीत बदल  तसेच लागवड खर्च ५० टक्क्यांनी कमी करने ,हमीभावावर राज्याने बोनस घोषीत करणे  ह्या उपाय योजना केल्या नाहीतर २०२६ मध्ये कृषी संकट व शेतकरी आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढतील अशी भीती किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे 

==================================================================


Comments

Popular posts from this blog

१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार

"अल्पसंख्यक और अमराठी-भाषी लोगों के खिलाफ भाषा/प्रांतवाद का जहरीला एजेंडा चलाने वाले श्री राज ठाकरे के साथ गठबंधन पर पुनर्विचार जरूरी ! "-शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे को शिवसेना के अपदस्थ प्रवक्ता किशोर तिवारी का खुला पत्र !

शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी