भारत-अमेरिका व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी प्रचंड प्रमाणात वाढणार -किशोर तिवारी
भारत-अमेरिका व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी प्रचंड प्रमाणात वाढणार -किशोर तिवारी दिनांक-११ फेबु २०२६ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयाने अमेरिका आणि भारत यांनी व्यापार करारासाठी एक अंतरिम मसुदा जारी केली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त विदर्भ ,मराठचाडा व उत्तर महाराष्ट्रातील सुमारे १ कोटी २० लाख शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होणार असुन भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांचे हित अमेरिका आणि भारत यांनी व्यापार करारामध्ये सुरक्षित असल्याचा दावा फोल ठरला असुन यामुळे कापसाच्या सोयाबीनच्या व इतर तेलबियांची किमती पडतील अशी भीती विदर्भाचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काम करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी व्यक्त केली आहे शुल्कमुक्त कापसाच्या आयातीचा करारामुळे महाराष्ट्राचे कापूस उत्पादक शेतकर्यांच्या आत्महत्या वाढतील अमेरिका आणि भारत यांनी व्यापार करारामध्ये विदर्भ मराठवाड्यातमध्ये उत्पादन होणाऱ्या लांब स्टेपल कापसाच्या आयातीला परवानगी दिली आहे शुल्कमुक्त आयातीची परवा...