“यवतमाळच्या गरीबांच्या घरकुलांचे तीन तेरा;१लाख७२हजार७०० मंजूर घरे अपूर्ण!सरकारने घरकुलांचा हिशेब द्यावा”-किशोर तिवारी
“यवतमाळच्या गरीबांच्या घरकुलांचे तीन तेरा;१लाख७२हजार७०० मंजूर घरे अपूर्ण!सरकारने घरकुलांचा हिशेब द्यावा”-किशोर तिवारी यवतमाळ -१८ सप्टेंबर २०२६ २०१९ मध्ये यवतमाळच्या भूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येक बेघराला घर देण्याचा विश्वास दिला. मात्र अधिकृत जिल्हा अहवालानुसार ३० जून २०२५ पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीणची २,३४,३४७ घरे मंजूर असून केवळ ६१,६४७ घरे पूर्ण झाली; तब्बल १,७२,७०० घरे अपूर्ण राहिली. मंजूर घरांपैकी जवळपास ७४ टक्के घरे अपूर्ण असतील, तर याला साधा प्रशासकीय अनुशेष म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. याहून गंभीर बाब म्हणजे— पहिला हप्ता शिल्लक- ७२,९८१, दुसरा हप्ता शिल्लक - ६५,४०९ तिसरा हप्ता शिल्लक- २०,२२३, ७२ हजारांहून अधिक मंजूर कुटुंबे पहिल्या हप्त्यावरच का अडकली? याचे लाभार्थीनिहाय उत्तर जिल्हा प्रशासनाने जनतेसमोर ठेवावे. पुसद, उमरखेड, महागाव, दारव्हा -सर्वाधिक अनुशेषाचा पट्टा पुसद — ३१,८४९, उमरखेड — २१,५६१, महागाव — १९,०२३, दारव्हा — १४,९५०, आर्णी — ११,४५०, दिग्रस — १०,६५५, घाटंजी — १०,३३०, केळापूर — ८,२९३, नेर — ८,०३१, यवतमाळ — ७,५९१, राळेगा...