महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व धर्मद्वेष-भाषाद्वेष रोखण्यासाठी महानगर निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान करणे काळाची गरज -किशोर तिवारी

महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी  व धर्मद्वेष-भाषाद्वेष रोखण्यासाठी महानगर निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान  करणे काळाची गरज -किशोर तिवारी 

दिनांक -१२ जानेवारी २०२६

नुकत्याच आटोपलेल्या नगरपरिषद व नगर पंचायत निवडणुकीमध्ये महायुतीच्या भाजप व शिंदेसेना राष्ट्रवादी अजित पवार या पक्षांनी प्रत्येक मतदार विकत घेऊन तर मुस्लिम मतदारांना मतदान न करण्यासाठी पैसे वाटुन सर्वच  निवडणुका  जिंकल्या नंतर आता सर्वच महाराष्ट्रात मतदाराला विकत न घेता  सरळ विरोधकांचे उमेदवारच विकत घेण्याचा "राहुल नार्वेकर पॅटर्न " सुरु करण्यात आलं असुन भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे दिलेली लोकशाहीचे सत्ताधारी पक्ष सरळ सरळ हुकूमशाहीत परिवर्तित करीत असुन भाजपाची बी टीम असलेले ओवेसी व राज ठाकरे हिंदू मुसलमान व मराठी अमराठी हा वाद निवडणुकीमध्ये उपस्थित करून महायुतीच्या पक्षांना निवडणुकीचा मार्ग मोकळा करीत असतांना आता फक्त सुजाण मतदारांना लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी फक्त काँग्रेस हाच पर्याय असुन येत्या महानगर निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान  करण्याचे आवाहन शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केले आहे . 

विदर्भात २०२५ मध्ये दररोज ४ मराठी शेतकरी आत्मह्त्या करीत असतांना "ठाकरे बंधू " यांना मराठी माणूस का आठवत नाही 

महानगर पालिका निवडणुकीत ज्या मराठी माणसाच्या पश्चिम  विदर्भात मागील वर्षी २००९ शेतकऱ्यांच्या होत असतांना एकदाही ढुंकूनही पहिले नाही ज्यांनी मुंबईमधून मराठी माणसाचे पलायन होत असतांना चक्क बध्याची भूमिका घेतली त्यांनी मराठी माणसाच्या नावाने तसेच नमाज व अजाणचा मुद्दा समोर करून मुसलमान समाजाला त्रास देणाऱ्या भाजपा व राज ठाकरे यांचा धर्मद्वेष-भाषाद्वेष रोखण्यासाठी महानगर निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान  करणे काळाची गरज असल्याचे किशोर तिवारी पत्रकाद्वारे मतदारांना आवाहन केले आहे . 

अंबानीच्या मुलाच्या लग्नात नाचणारे व अडाणी कडून देणगी घेणारे "ठाकरे बंधु " यांचा गुजराथी विरोध हा एक दंभ 

गौतम अडाणी यांचे कडुन वेळोवेळी देणगी घेणारे तर मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात नाचायला जाणारे यांचा अडाणी -अंबानी विरोध ही एक नूरा कुस्ती असुन मागील ३ वर्षात मुंबईची हजारो एकर जमीन अडाणीच्या घशात टाकतांना "ठाकरे बंधूंचे" मौन एक रहस्य आहे . मागील २५ वर्षात मुंबईच्या विकासावर धर्म भाषा जातीच्या मतदारांना मतदान मागणे सोडुन बिहारी उत्तर भारतीय गुजराथी तामीळ भाषीक लोकांना धमक्या देणे ही कृती भाजपा कडे अमराठी मतदारांना वळविण्याचा राज ठाकरे यांचा उधोग असुन सर्व धर्म भाषा जातीच्या मतदारांना या लोकशाही विरोधी हुकूमशाही आणणाऱ्या भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस एकमेव पर्याय असुन येत्या निवडणुकीत काँग्रेसला मजबूत करण्याचे विनंती किशोर तिवारी यांनी केली  आहे . 

-----------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार

"अल्पसंख्यक और अमराठी-भाषी लोगों के खिलाफ भाषा/प्रांतवाद का जहरीला एजेंडा चलाने वाले श्री राज ठाकरे के साथ गठबंधन पर पुनर्विचार जरूरी ! "-शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे को शिवसेना के अपदस्थ प्रवक्ता किशोर तिवारी का खुला पत्र !

शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी