धरम गोटा कोलाम पोड व घुबडी येथील पिण्याचे पाणी व वीज पुरवडा या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी किशोर तिवारी यांचा ३० जूनला दौरा
धरम गोटा कोलाम पोड व घुबडी येथील पिण्याचे पाणी व वीज पुरवडा या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी किशोर तिवारी यांचा ३० जूनला दौरा
दिनांक -२९ जुन २०२४
निवडणुकीच्या धुमाळीत सर्व लोकप्रतिनिधी धुंद असताना नौकरशाही जनतेच्या पिण्याचे पाणी ,वीज पुरवडा ,अन्न सुरक्षा ,पीक कर्ज वाटप ,आरोग्य व्यवस्था या सारख्या गंभीर समस्यांवर लक्ष न देता फक्त पैसे खाण्यात व्यस्त आहेत तर आमदार ,जिल्हा परीषद सदयस्य निवडणुकीत लोकांनी नाकारल्यामुळे याना वाऱ्यावर सोडा अशा सूचना दिल्यामुळे सर्व अधिकारी माजले असुन असाच मस्तवाल पाहण्यासाठी शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी,सामाजिक कार्यकर्ते गंगारेड्डी क्यातमवार आदिवासी नेते अंकित नैताम ,प्रेमभाऊ चव्हाण ,शंकरभाऊ अंधारे ,माणीक भाऊ पेंदोर हे दिनांक ३० जूनला धरमगोटा पोड ,खैरी पोड ,घुबडी ,वळवाट पोड या सर्व ठिकाणी भेट देऊन झोपलेल्या सरकारला निर्वाणीचा इशारा देणार आहे .जे सरकार पिण्याचे पाणी ,वीज ,घर ,अन्न व आरोग्य सेवा,पीक कर्ज देत नाही त्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही आता या सरकारला तडीपार करण्यासाठी ही लढाई सुरु असल्याची घोषणा किशोर तिवारी यांनी यावेळी केली

Comments
Post a Comment