महाराष्ट्रात ७० लाख हेक्टर वरील उभी पीके पूर्णतः बरबाद : राज्य सरकारची शेतकऱ्यांना मदत अपुरी - केंद्र सरकारने कमीतकमी ५० हजार कोटीची मदत करावी -किशोर तिवारी
दिनांक -२३ सप्टेंबर २०२५
यावर्षी महाराष्ट्रात खरीप हंगामात १ कोटी ६ लाख हेक्टर मध्ये मुख्यतः नगदी पिके कापूस सोयाबीन मक्का उडीत तूर ज्वारी ऊस कांदा हि नगदी पिके लावण्यात आली होती यासोबतच बागायती पिके सुद्धा पेरण्यात आली होती अनेक भागात जून मध्ये रट्ट्या पाऊस आल्याने दुबार तिबार पेरणी करावी लागली त्यानंतर संपुटन्ट जून जुलै ऑगस्ट व आता सप्टेंबर सतत मुसळधार पाऊसाने कहरच केला त्यात रोगराई वाढल्याने कीटक नाशक ,अभुतपुर्व गवत वाढल्याने तणनाशक याचा विक्रमी वापर शेतकऱ्यांनी केला .कशीतरी उरलेली पिकांची मशागत करू या आशेने शेतकऱ्यांनी काळाबाजारातून युरीया विकत घेऊन टाकला मात्र हा सारा विक्रमी खर्च वाया गेला . शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल ,कृषी ,ग्राम विकास यांच्या कडे ५० टक्केही कर्मचारी नाहीत अशा परिस्थिती जिल्हा प्रशासन अपुरी माहीती वातानुकूल मंत्रालयात पाठवीत आहे .मुख्य मंत्री ,उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री हे कोणत्याही नापिकीग्रस्त भागात दिसत नसुन विरोधी पक्ष फक्त निवेदन देत असल्याचे विदारक चित्र आहे ,असा अनुभव किशोर तिवारी यांनी पश्चिम विदर्भ व मराठवाड्याचा दौरा केल्यावर व्यक्त केला आहे .
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या कृषी मंत्री व कृषी सचिव ,कृषी आयुक्त यांनी पाहणी दौरा न करता ही तातडीची मदत कोणत्या आधाराने घोषित केली न समजणे कठीण आहे जर ही मदत ३१ लाखावर शेतकऱ्यांना सरासरी ७ हजार दराने कशी काय घोषीत करण्यात आली आहे एकूण नापिकीग्रस्त शेतकरी ६८ लाखांवर आहेत यातून कोणाला देणार या प्रश्न किशोर तिवारीं उपस्थित करून जे नेते विरोधात असतांना ५० हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी करीत होते ते आता हेक्टरी ३ ते ४ हजार रुपये घोषित करून शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळत आहेत असा आरोप करीत फक्त कमिशन खाण्यासाठी समृद्धी मेट्रो सारखे प्रकल्प आणून १० लाख कोटी रुपयाचे कर्ज काढणाऱ्या देवाभाउने आपल्या लाडक्या बहिणीचे कुंकू वाचविण्यासाठी आता आणखी १ लाख कोटीचे कर्ज घ्यावे ,ही हात जोडून विनंती केली आहे .
===========================================================

Comments
Post a Comment