Posts

Showing posts from October, 2025

पांढरकवडा नगरीच्या पाणी पुरवडा योजनेत ६५ कोटींचा भ्रष्टाचार -किशोर तिवारी यांची सि बि आई मध्ये शपथपत्रावर याचीका

Image
पांढरकवडा नगरीच्या पाणी पुरवडा योजनेत ६५ कोटींचा भ्रष्टाचार -किशोर तिवारी यांची सि बि आई मध्ये शपथपत्रावर याचीका  दिनांक -१ नोव्हेंबर २०२५ सार्वजनिक जीवनातुन भ्र्ष्टाचार निर्मूलन करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागतीक स्तरावर गाजत असलेल्या प्रत्येक घरात नळाने शुद्ध पाणी देण्याच्या पवित्र कार्यात यवतमाळ जिल्ह्यात मंत्री ,प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांनी पोसलेले कंत्राटदार यांनी एक हजार पाचशे कोटीची (१५०० कोटी ) ची उधळपट्टी व भ्रष्टाचार केला आहे त्याची पहिली तक्रार सामाजिक कार्यकर्ते किशोर तिवारी सरळ सि बी आई मध्ये दाखल केली असुन भ्र्ष्टाचाराचे सर्व पुरावे जोडले  आहेत अशीच तक्रार लोकायुक्त महाराष्ट्र ,केंद्रीय जांच आयोग व भारताचे पंतप्रधान यांचे कडे दिली आहे यामध्ये जिल्ह्याचे मंत्री ,जिल्हाधिकारी ,नगर परिषदेचे मुख्याधिकारी ,तातडीने देयके काढण्यासाठी दबाव व मुख्याधिकारी याना मारहाण करणारे गुंड कंत्राटदार यांचा समावेश आहे व हि देयकांमधील कोट्यवधींची हिस्सा घेणारे दानशुर व्यक्तींची नावे  सुद्धा आहेत या भ्रष्ट व्यवहार करणारे अधिकारी व कंत्राटदार ...

१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार

Image
 १० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम  -दानशुर  किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार  दिनांक - ३० ऑक्टोबर २०२५  यावर्षी प्रचंड नापीकी व ओला दुष्काळ पडल्यामुळे ऐन दिवाळीत आदिवासी कोलाम पोडावर उपासमार होत असतांना झरीजामणी तालुक्यातील आंबेझरी केळापूर तालुक्यातील मारेगाव सोन कोलाम पोड ,वसंत नगर तांडा ,खैरगाव देशमुख कोलाम पोड ,नांदगाव कोलाम पोड व वांजरी कोलाम पॉड  येथे लंडन येथील रोहीत  शेलटकर यांच्या  ग्रँड मराठा फॉउंडेशन तर्फे संचालक किशोर तिवारी व पांढरकवडा येथील मूळ निवासी प्रसिद्ध समाजसेवक किसनराव बोरेले यांच्या पुढाकाराने दिवाळीची प्रत्येकी ६०० रुपयाची आनंदाची किट वाटप केले असुन त्यांचे दिवाळीत अश्रू पुसले असुन हा कार्यक्रम २१ व २२ तसेच २३ ऑक्टोबरला पार पडला आहे .  १० हजार पीयू लेदर बॅगचे भाऊबीजेच्या ओवाळणीत बहिणींना पांढरकवड्यात अभूतपुर्व वाटत   प्रत्येक वर्षी "आपला भाऊ किशोर भाऊ"  या मागील सहा वर्षापासुन उपक्रम चालविणारे अंकित नैताम यांनी सर्व गरीब बहिणींना दानशुर किसान भाऊ बोरले यांच्या पुढाकाराने व सहकार्याने २६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्...

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गोरखधंदे तात्काळ रोखण्यासाठी व हजारो शेतकऱ्यांची कोट्यावधीच्या लुटीवर किशोर तिवारी आरबीआई सीबीआय सहकार सचिव यांचेकडे पुराव्यासह याचिका

Image
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गोरखधंदे तात्काळ रोखण्यासाठी व हजारो शेतकऱ्यांची    कोट्यावधीच्या लुटीवर किशोर तिवारी आरबीआई  सीबीआय  सहकार सचिव यांचेकडे पुराव्यासह याचिका  दिनांक -१९ ऑक्टोबर २०२५ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार, SLR डिफॉल्ट आणि 53 टक्क्यांपेक्षा जास्त एनपीए असलेल्या या बँकेने आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र या भरतीसाठी तब्बल 35 ते 50 लाख रुपये मागण्यात येत असल्याचा गंभीर तक्रारींचे शपथपत्र व सर्व दस्तावेज मिळाल्यानंतर  या अभूतपूर्व भ्र्ष्टाचार सहकार विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संगममताने अनियंत्रितपणे सुरु केल्यानंतर प्रशासक नियुक्त करून रोखण्यासाठी भारतातील शेतकऱ्यांचे मागील ४० वर्षापासुन हितासाठी लढा देणारे  किशोर तिवारी यांनी  आरबीआई  सीबीआय  सहकार सचिव   यांचेकडे शपथपत्रावर कायदेशीर याचीका दिनांक १५ व १६ ऑक्टोबरला अधिकृतपणे दाखल केली केली आहे. जी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी स्व वसंतराव नाईक व स्वर्गीय उत्तमराव पाटील यांनी महाराष्ट्रात शिखरावर ठेवली हो...

शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेजचे किशोर तिवारी कडून स्वागत

Image
शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेजचे किशोर तिवारी कडून स्वागत  दिनांक -८ ऑक्टोबर २०२५ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यातील पावसामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले त्याचे स्वागत महाराष्ट्राचे प्रमुख शेतकरी नेते किशोर तिवारी आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी पॅकेज घोषित करीत असतांना  सुमारे १ कोटी हेक्टर शेतीची लागवड झाली त्याच्या पैकी राज्यातील   ३६ जिल्ह्यांपैकी २९ जिल्ह्यांमध्ये  ६८ लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले मात्र उर्वरीत जवळपास २० लाख हेक्टरमध्ये परचंद नापिकी झाली असल्यामुळे त्यांचाहि विचार विस्तारित पॅकेज करावा अशी विनंती केली आहे    नुकसान भरपाई पॅकेजमध्ये २,०५९ महसूल विभागांमधील २९ जिल्हे आणि २५३ तालुके समाविष्ट आहेत सरकारने   राज्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे ६८ लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे हे कबुल केले आहे यावरून हे कृषी संकट अभुतपुर्व असुन प्रशासकीय कारवाई दिवाळीपुर्वी करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याची विनंती किशोर तिवारी यांनी यावेळी ...