Posts

Showing posts from September, 2025

शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी

Image
 शपथपत्रावर सर्रास  खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया  यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी  दिनांक -२६ सप्टेंबर २०२५ अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सामाजिक जीवनात आलेल्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी आपले सुविद्य पती अनिश दमानिया यांच्यासोबत सर्व नियम धाब्यावर ठेऊन गैरमार्गाने व्यवहार करून कोट्यवधींची संपत्ती अर्जित केली असुन त्यांना अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा निधी पोटभरू धंदे करण्यासाठी वापरल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे माजी पदाधिकारी नितीन चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन केली नंतर आता श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया या काचेचा घरात राहुन दगड मारतात असल्याचा आरोप शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी केला आहे .  आपल्या सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांना खुलासा करण्यासाठी सादर केलेल्या प्रश्न्नावलीची  करणे देतांना त्यांनी अंजली दमानिया यांनी २५ सप्टेंबरला २०२५  भारताचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे विरोधात घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये गडकरी  मुलांच्या व म्हैसकर यांच्यावर केलेल्या अतिशय खोट्या आरोपामुळे ...

महाराष्ट्रात ७० लाख हेक्टर वरील उभी पीके पूर्णतः बरबाद : राज्य सरकारची शेतकऱ्यांना मदत अपुरी - केंद्र सरकारने कमीतकमी ५० हजार कोटीची मदत करावी -किशोर तिवारी

Image
महाराष्ट्रात ७० लाख हेक्टर वरील उभी पीके पूर्णतः बरबाद : राज्य सरकारची  शेतकऱ्यांना मदत अपुरी - केंद्र सरकारने  कमीतकमी ५० हजार कोटीची मदत करावी -किशोर तिवारी  दिनांक -२३ सप्टेंबर २०२५  महाराष्ट्रात १ जून पासून सुरु असलेला पाऊस यावर्षी दसरा दिवाळीत सुद्धा असाच अक्षरशः धुमाकूळ घालणार आहे मात्र आज पर्यंत  विदर्भ, कोकण मराठवाड्यात,उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र,खान्देश पावसाच्या या रौद्ररुपाच्या ढगफुटीने सोयाबीन ,मक्का ,कापुस ,उडीत ,ऊस धान नष्ट झाले आहे हे नुकसान ३० जिल्ह्यमध्ये ७० लाख हेक्टर वर आता २६ सप्टेंबरपासून उरलेल्या ३५ लाख हेक्टर मधील उरलेली पिके सुद्धा नष्ट होणार आहे, महाराष्ट्रात अतिवृष्टीने संपुर्ण खरीप अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे त्यातच आज राज्यसरकारने २  हजार २१५ कोटीची मदत  फक्त ३१ लाखावर शेतकऱ्यांना प्रत्येकी सरासरी ७ हजार रुपयाची तोटकी मदत जाहीर केली आहें  .एकीकडे आजपर्यंत शेतकऱ्यांचा ७० लाख हेक्टर वर लागवडी साठी खर्च कमीतकमी ५० हजार कोटी झाला असल्यामुळे मायबाप सरकारने कमीतकमी लागवडीचा खर्च तरी द्...

भारताच्या इथेनॉल बाजारपेठेत ०.६% पेक्षा कमी वाटा असूनही निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांच्या विरुद्ध खोटारडा प्रचार कां ??- किशोर तिवारी यांचा सवाल

Image
भारताच्या इथेनॉल बाजारपेठेत ०.६% पेक्षा कमी वाटा असूनही  निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांच्या विरुद्ध   खोटारडा प्रचार कां ??- किशोर तिवारी यांचा सवाल  तारीख - ३ सप्टेंबर २०२५ माहिती युद्धाच्या युगात, धारणा अनेकदा वास्तवापेक्षा जास्त प्रबळ होतात व आपलीच माणसे खारे  आहे का म्हणुन विचारतात ,नितीन गडकरी यांच्या विरोधात त्यांचे पुत्र निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांच्या बाबतीत असेच होत आहें कारण मागील ८ दिवसांपासुन ही मंडळी  सुनियोजित वादाचे केंद्रबिंदू बनले आहेत तेव्हा मला ही   त्यांच्या कुटुंबाचे नाव आणि इथेनॉल क्षेत्रात त्यांच्या प्रवेशामुळे ते राजकीय प्रतिस्पर्धी, परदेशी लॉबी आणि चुकीच्या माहिती खारे  आहे का तेव्हा  मी या घृणास्पद प्रचाराचे सत्य शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेतकरी नेते आणि विरोधी पक्षातील प्रमुख आवाज किशोर तिवारी यांनी आज मांडलेले तथ्य स्पष्ट झाले आणि प्रत्येक भारतीयाने हे समजून घेतले पाहिजे असे आहे .   निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांचा इथेनॉल व्यवसाय भारताच्या एकूण इथेनॉल उत्पादनात ०.६% पेक्षा कमी वाटा देत...