आर्थिक संकल्प २०२४-शिवसेना (उबाठा ) प्रतिक्रिया : केंद्राने महाराष्ट्राची संपुर्ण उपेक्षा केली-किशोर तिवारीं
आर्थिक संकल्प २०२४-शिवसेना (उबाठा ) प्रतिक्रिया : केंद्राने महाराष्ट्राची संपुर्ण उपेक्षा केली-किशोर तिवारीं दिनांक -२३ जुलै २०२४ एकीकडे महाराष्ट्राचे दिवाळखोर भ्रष्ट मिंधे सरकार आपल्या अर्थ संकल्पात सुमारे दीड लाख कोटीच्या सामाजिक सुरक्षेच्या योजना घोषित करतात त्यावेळी मात्र केंद्र सरकार महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करून करतात महाराष्ट्रातील कर्ज बाजारी आत्महत्याग्रस्त कापूस सोयाबीन ८० लाख शेतकऱ्यांच्या कर्ज माफी ,कापसाच्या व सोयाबीनच्या नापिकीचा प्रश्न ,हमीभावाचा मुद्दा ,सिंचनाचा बॅकलॉग ,महागड्या वीज निर्मितीचा अडाणी प्रकोप यासाठी एकही दमडी न दिल्यामुळे भाजपचा पराजय येत्या विधान सभेच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी निश्चित केल्याची प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) चे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केली आहे महाराष्ट्रात दररोज ८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, बेरोजगारी, अपूर्ण प्रकल्प, मुंबई ,पुणे ,नागपुर सह विदर्भ,मराठवाडा उत्तर महाराष्ट्र साठी विशेष निधी जाहीर झाला नाही यावर एक पैसाही दिला गेला नाही आंध्र बिहार सारखे विषेय पॅकेज निवडणीपूर्वी देणे गरजेचे ...