महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व धर्मद्वेष-भाषाद्वेष रोखण्यासाठी महानगर निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान करणे काळाची गरज -किशोर तिवारी
महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व धर्मद्वेष-भाषाद्वेष रोखण्यासाठी महानगर निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान करणे काळाची गरज -किशोर तिवारी दिनांक -१२ जानेवारी २०२६ नुकत्याच आटोपलेल्या नगरपरिषद व नगर पंचायत निवडणुकीमध्ये महायुतीच्या भाजप व शिंदेसेना राष्ट्रवादी अजित पवार या पक्षांनी प्रत्येक मतदार विकत घेऊन तर मुस्लिम मतदारांना मतदान न करण्यासाठी पैसे वाटुन सर्वच निवडणुका जिंकल्या नंतर आता सर्वच महाराष्ट्रात मतदाराला विकत न घेता सरळ विरोधकांचे उमेदवारच विकत घेण्याचा "राहुल नार्वेकर पॅटर्न " सुरु करण्यात आलं असुन भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे दिलेली लोकशाहीचे सत्ताधारी पक्ष सरळ सरळ हुकूमशाहीत परिवर्तित करीत असुन भाजपाची बी टीम असलेले ओवेसी व राज ठाकरे हिंदू मुसलमान व मराठी अमराठी हा वाद निवडणुकीमध्ये उपस्थित करून महायुतीच्या पक्षांना निवडणुकीचा मार्ग मोकळा करीत असतांना आता फक्त सुजाण मतदारांना लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी फक्त काँग्रेस हाच पर्याय असुन येत्या महानगर निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान करण्याचे आवाहन शेतकरी नेते कि...